चित्रपटाच्या इतिहासात डोकावताना अनेक संदर्भ, तपशील, माहिती, गोष्टी, किस्से, कथा, दंतकथा यांसह अनेक गोष्टी त्यात आहेत....आणि हीच त्या चित्रपट इतिहास, भूगोल, अंकगणित, बीजगणित यांची गंमत जंमत आहे. याच हिंदी चित्रपटसृष्टीत कपूर, खान, खन्ना, कुमार, जोहर, भट्ट अशा आडनावाच्या कलाकारांना सहजी रुपेरी पदार्पणाची संधी असली तरी त्याना आपले कर्तृत्व सिध्द करावेच लागते. कारण कॅमेरा तुम्हाला व्यवस्थित…
मिडियात असल्यानेच कोणत्याही दिवशी काहीही घडू शकते याची सवय जणू अंगवळणी पडलीय. १९८२ सालापासून मी मिडियात आहे. मुद्रित माध्यमापासून ते उपग्रह वाहिन्यांचे जग, डिजिटल युग असा प्रवास करत असतानाच आजूबाजूच्या गोष्टींवर लक्ष ठेवणे सवयीचे झाले आहे. हे का सांगतोय? तर, २६ जुलै १९८२ च्या दुपारनंतरची वेळ. पीटीआय व यूएनआय या वृत्तसंस्थेने 'न्यूज फ्लॅश करीत म्हटलं,…
ते दिवसच वेगळे होते. नवीन चित्रपटाचा अतिशय ग्लॅमरस, देखणा, महागडा आणि पुढचे अनेक दिवस चर्चेत राहिल असा हुकमाचे चारही एक्के असलेला मुहूर्त म्हणजे पूर्वीच्या हिंदी चित्रपटसृष्टीची खासियत. चित्रपटाच्या मुहूर्तालाच एक भारी सेलिब्रेशन. अनेकदा तर असे मुहूर्त भारी गाजले, पण पिक्चर फ्लॉप झाला... धर्मेंद्रने अनेक चित्रपटात 'चोर नायक' साकारला. असाच हा एक महागडा चित्रपट.
कृष्णा शहा…
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र २४ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या चाहत्यांना कायमचे सोडून गेले... अभिनयात ज्यांचा कुणी हात धरु शकणार नाही अशी कामगिरी त्यांनी आजवर केली.. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत खऱ्या अर्थाने हा कलाकार काम करत राहिला... धर्मेंद्र कुशल अभिनेते होते हे आपण जाणतोच पण त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत इतिहास रचला होता... धर्मेंद्र यांच्या दोन्ही मुलांना सनी…
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला पटकथा संवाद लेखक सलीम खान म्हटलं की, सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान, अर्पिता खान यांचे पिता अशी ओळख असेल. पण सत्तरच्या दशकातील आम्ही चित्रपट रसिकांना सलीम खान आणि जावेद अख्तर ही जोडी म्हणजे, चित्रपट पटकथा आणि संवाद लेखक जोडी म्हणून माहीत आहेत. सलीम खान यांच्या वाढदिवसानिमित्त (जन्म दिनांक २४…
आज मी लोकल ट्रेनने अंधेरीतील पूर्व बाजूला उतरुन पश्चिम एक्स्प्रेस हायवेकडे निघालो अथवा मेट्रो ट्रेनने गुंदवली स्टेशनवर उतरलो की माझी नजर कार्नरवरील अतिशय उंच इमारतीवरील 'नटराज' हे वाचण्याकडे जातेच जाते आणि मी जुन्या आठवणीत रमतो. ती उत्तुंग इमारत नटराज स्टुडिओ पाडून उभीं राहिलीय. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात या नटराज स्टुडिओचे खूपच मोठें व महत्त्वाचे स्थान आहे.…
आजच्या डिजिटल युगात मल्टीप्लेक्स आणि ओटीटीवर जगभरातील अनेक भाषेतील चित्रपट आणि कन्टेन्ट पाहायला मिळत असताना मुंबईतील जुन्या काळातील एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सचे भवितव्य ते काय? असा एक प्रश्न असतो. एकेक करत करत मुंबई तर झालेच पण महाराष्ट्रातील, देशातील जुन्या काळातील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स काळाच्या पडद्याआड जात आहेत. जुन्या पिढीतील चित्रपट रसिक सोशल…
आजच्या कार्पोरेट युगात चित्रपटाचे यश किती कोटींची कमाई केली यात मोजले जाते. कधी कधी त्या उत्पन्नाचा आकडा इतका नि असा मोठा असतो की हा चित्रपट खरंच इतका मोठा होता का असा प्रश्न पडतो तर कधी आपण हाच चित्रपट पाह्यला गेलो तेव्हा जे काही मोजके चित्रपट रसिक होते ते तर एकमेकांपासून फार दूर बसले होते आणि…
आज आपण कळत नकळतपणे विविध प्रकारच्या जाहिरातीच्या विळख्यात सापडलो आहोत. मुद्रित माध्यमापासून ते सार्वजनिक जीवनात आज कुठे ना कुठे आपल्या नजरेसमोर म्हणा अथवा कानावर जाहिरात अथवा जाहीरातीतील गाण्याचा मुखडा येतो. हातातील मोबाईलवरही अनेक जाहिरातपट समोर येतात. जाहिरातीच्या त्या भडिमारात अथवा जंजाळात आपलीच जाहिरात अधिकाधिक लक्षवेधक ठरावी, तीच ग्राहकांच्या मनात वा मेंदूत फिट्ट बसावी यासाठी ती…
शीर्षकावरून फिल्म दीवाने वगळता बाकीचे कदाचित गोंधळात पडले असतील... अमिताभ बच्चनने रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे साडेसहा कोटींचे तीन भूखंड विकत घेऊन आपल्या हक्काच्या जागेचा विस्तार केला हे समजले, पण त्यात मुकुल आनंद दिग्दर्शित ‘अग्निपथ’ (१९९०) या चित्रपटाचा संबंध काय असा हे शीर्षक वाचून आणखीन एक प्रश्न पडला असेल.
मुनवली हे गाव समुद्र…