साधारणतः ५० च्या दशकापासून सुरु झालेला बॉलिवूडचा ‘फॅशन’ प्रवास मोठा रंजक आहे. अगदी साडीपासून सुरु होऊन आजच्या शॉर्ट्स पर्यंत आलेला हा प्रवास अविरतपणे २००० च्या दशकापर्यंत चालू होता. आताही चालू आहेच. परंतु, बॉलिवूडचा जनसामान्यांवर असणारा प्रभाव तुलनेने बराच कमी झाला आहे. ५० च्या दशकापासूनचा बॉलिवूडचा फॅशन प्रवास कसा होता, याचा थोडक्यात आढावा –
कौटुंबिक आणि प्रेमकहाण्यांवर आधारित मालिकांच्या जमान्यात ‘सरोगसी’ सारख्या नाजूक विषयावर मालिका आणि ती देखील प्राईम टाईमला प्रक्षेपित करणं हे मोठं धाडस होतं. पण प्रेक्षकांनी या वेगळ्या वाटेवरच्या मालिकेचंही अगदी मनापासून स्वागत केलं.
१९९६ साली आलेला राज हिंदुस्थानी हा एक रोमँटिक चित्रपट होता. हा चित्रपट १९६५ सालच्या ‘जब जब फुल खिले’ या चित्रपटावरून प्रेरित होता. राजा हिंदुस्थानी विशेष लक्षात राहिला तो यामधील “परदेसी परदेसी…” या गाण्यासाठी. राज हिंदुस्थानी १९९६ सालचा ब्लॉकबस्टर हिट तर ठरलाच शिवाय नव्वदच्या दशकातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला.
धर्मपुत्र, कानून, वक्त, मशाल यासारखे वेगळ्या वळणावरचे चित्रपटही चोप्रांनी दिले. पण तरीही यश चोप्रा ओळखले जातात ते रोमँटिक चित्रपटांसाठीच. ‘किंग ऑफ रोमान्स’ ही पदवी त्यांना उगाच का मिळाली? बॉलिवूडचे ९० ते ९५% चित्रपट प्रेमकहाणीच तर दाखवतात. मग ते सर्वच चित्रपट सुपरहिट झाले का, तर नाही. मग यश चोप्रांच्या चित्रपटामध्ये असं काय होतं की, कित्येक आठवडे…
२००७ साली झी मराठी वाहिनीवर रहस्याची छोटीशी किनार असणारी एका वेगळ्या वळणावरची प्रेमकथा प्रेक्षकांसमोर आली. या मालिकेमध्ये लव्ह ट्रँगल नाही, तर लव्ह स्क्वेअर दाखवण्यात आला होता.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हम दिल दे चुके सनम या चित्रपटाला संगीत दिलं होतं, इस्माईल दरबार यांनी. हा चित्रपट त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. चित्रपटाला एकूण ८ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. यामध्ये ऐश्वर्या रायला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाल होता. या चित्रपटाच्या मेकींग दरम्यानच्या काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती घेऊया –
अकरा वर्ष! या मोठ्या कालावधीत मालिकेमध्ये एवढी उपकथानकं दाखवण्यात आली की, त्यावरील प्रत्येक कथानकावर स्वतंत्र मालिका तयार होऊ शकेल. या प्रवासात मालिकेमध्ये कित्येक पात्र आली आणि गेली. प्रेक्षकांनी हे सर्व बदल अगदी सहज स्वीकारले आणि मुख्य म्हणजे यामुळे मालिकेच्या लोकप्रियतेमध्ये तसूभरही फरक पडला नाही.
तसं बघायला गेलं तर, ‘रोजा (Roja)’ हा चित्रपट ‘देशभक्तीपर’ या कॅटेगरीमध्ये मोडत नाही. ही एक प्रेमकहाणी आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३० वर्ष पूर्ण झाली. १५ ऑगस्ट १९९२ साली तामिळ भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला दक्षिणेत प्रेक्षकवर्ग आणि समीक्षकांची प्रशंसा या दोन्ही गोष्टी भरभरून मिळाल्या. यानंतर हिंदी भाषेत डब करून संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला.…
देखणा चेहरा नाही, आवाजात जरब नाही, नृत्याचं अंग नाही आणि अभिनयही यथातथाच. अशा परिस्थितीत त्याचा बॉलिवूडमध्ये टिकाव लागणं तसं अवघडच होतं पण तो टिकला. पहिल्याच चित्रपटात नायिका म्हणून लाभली ती गोड चेहऱ्याची दिव्या भारती. तेव्हा सोशल मीडिया असता तर, या विजोड जोडीवरून कित्येक मिम्स तयार झाली असती. असो.
या मालिकेमध्ये ‘मेलोड्रामा’ होता, पण टिपिकल एकता कपूरचा ‘फॅमिली’ टच नव्हता. म्हणजे या मालिकेत दाखवण्यात आलेलं नायकाचं कुटुंब सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंब होतं. कुठलाही बडेजाव नाही, मोठमोठे महाल नाहीत, महागड्या साड्या नेसून, अंगभर दागिने घालून घरात वावरणाऱ्या बायका नाहीत की, मुळूमुळू रडणारी नायिकाही नाही. होती फक्त एक तरल प्रेमकहाणी.