जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली असून गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल रोजी ही सांगीतिक मैफल रंगणार आहे. या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
सामान्य क्रिकेटरच्या आयुष्यातील संघर्ष अनेक चित्रपटातून दाखवला गेला आहे, पण २०१९ चा तेलगू चित्रपट ‘जर्सी’ मधील हा ‘failed cricketer’, विफल पती आणि एका कंगाल पित्याची कहाणी बहुतांश स्पोर्ट्स ड्रामाच्या तुलनेत एक उत्कृष्ट कलाकृती मनावर छाप पाडून जाते.
शोभना समर्थ (Shobhna Samarth) यांचं आयुष्य चिकार चढ-उतारांनी भरलेलं होतं. कुमारसेन समर्थ बरोबर असलेला त्यांचा संसार का मोडला? त्यांच्या आयुष्यात मोतीलालचं काय स्थान होतं? त्यांची मुलगी नुतन बरोबर त्याचं नेमकं भांडण काय होतं? असे नको ते प्रश्न देखील मी विचारत होतो.
सध्या सर्वजण होळीच्या रंगात न्हाऊन निघत असताना त्याला बॉलिवूड अपवाद कसं असेल. तब्बल दोन वर्षांनंतर कोरोनाचं सावट हटल्यावर सर्वजण होळी खेळायला उत्सुक आहेत. बॉलिवूडमध्ये तर कित्येक सेलिब्रेटींच्या घरी होळी साजरी केली जाते. पण काही कलाकार असे आहेत ज्यांना होळी खेळायला अजिबात आवडत नाही. हे कलाकार कुठले? चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. (Bollywood Celebrities)
१. टायगर श्रॉफ …
अभिनेत्री शेफाली शाह म्हणाली- “काही गोष्टी अशा असतात की, तुम्ही त्यात भाग घेऊ शकत नाही, जलसा माझ्यासाठी असाच एक अनुभव होता.माझ्या अलीकडच्या भूमिकेच्या विपरीत, जलसामधील रुक्सानाची माझी भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. तथापि, आईच्या अगतिकता आणि संदिग्धता इतरांसारख्याच असतात आणि त्यामधून जगणे खरोखरच एक कलाकार म्हणून पूर्ण होते. आपले परिश्रम एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत…
आपल्या भूमिकेविषयी हृता दुर्गुळे म्हणते, ” आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे.’’ तर चित्रपटाचे निर्माता रवी जाधव म्हणतात, ”आज महिला दिनाच्या निमित्ताने हे पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे.
हेमामालीनीने आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच वेगळे ठेवले होते. तिचं सौंदर्य, तिचा अभिनय याचप्रमाणे तिचा इंडस्ट्रीमधला वावरही अगदी सहजसुंदर होता. तर अशा या गोड हेमामालिनीसाठी पार्श्वगायन करायला लता दीदींनी चक्क नकार दिला होता.
बॉलिवूडमध्ये काही कलाकार जसे अचानक येतात तसेच अचानक कुठे गायब होतात कळतही नाही. नंतर कधीतरी त्यांच्याबद्दल माहिती मिळते आणि कळतं बॉलिवूडमध्ये जरी ते यशस्वी झाले नसले, तरीही त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवली आहे. आज आपण अशाच काही अभिनेत्रींनबद्दल आणि “त्या सध्या काय करतात” याबद्दल जाणून घेऊया. (Actresses failed in Bollywood)
‘सरस्वती चंद्र’ या सिनेमाचे संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्या ‘म्युझिक रूम’ मध्ये काम करीत होते. एक लिफाफा आला. हे पत्र कोण देऊन गेलं याबद्दल कुणालाच माहित नव्हते. पाकीट फोडल्यावर त्यांना आणखी आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यात एक गुलाबचे फूल होते आणि पत्रावर ओठाच्या लिपस्टिकचा ठसा होता आणि लिहिलं होतं ‘टू डिअर…’!
चित्रपटसृष्टीमध्ये अनेकदा एक कलाकाराला भूमिकेची ऑफर मिळते, पण प्रत्यक्षात ती भूमिका दुसऱ्याच कलाकाराला देण्यात येते. अनेकदा कलाकारांच्या या आगमन – निर्गमनाची खरी कारणे आपल्यासमोर येतातच असं नाही. अशाच काही कलाकारांच्या आगमन – निर्गमनाची माहिती घेऊया