एखादा चित्रपट ऐंशी टक्क्याच्या वर तयार होतो त्यानंतर मात्र आर्थिक टंचाईमुळे या चित्रपटाची निर्मिती ठप्प होते पण त्याच वेळी या सिनेमाच्या रेकॉर्ड्स मार्केटमध्ये येतात गाणी प्रचंड गाजत असतात त्यामुळे हा चित्रपट कसाबसा तयार करून तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित होतो. गाण्याच्या जोरावर चित्रपटाला यश मिळते पण चित्रपट निर्मितीमध्ये प्रचंड कालावधी गेला असला तरी गाण्याच्या लोकप्रियतेमुळे चित्रपटा…
बात पुरानी बडी सुहानी
राजश्रीच्या चित्रपटांचा काळ कोणता असेल अशी कल्पना न येवू देण्याची दखल सिनेमातून घेतलेली असली तरी त्या कथानकाच्या एकूणच भौगोलिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर आपण अंदाज बांधू शकतो. ८ डिसेंबर १९७९ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सावन को आने दो’ या चित्रपटातील कथानकाचा काळ हा नक्कीच पन्नासच्या दशकातील आहे. कारण यात अजून सायकल रिक्षा, माणसाने ओढायच्या रिक्षा , कच्चे…
निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी १९८५ साली ज्येष्ठ मराठी साहित्यिक चि. त्र्य. खानोलकर यांच्या 'कालाय तस्मै नम:' या साहित्य कृतीवर एक हिंदी चित्रपट बनवला होता ‘अनकही’. ज्योतिष्य शास्त्र आणि आधुनिक विज्ञान यांच्या परस्पर संबंधावरील भाष्य करणारा हा एक अप्रतिम चित्रपट होता. चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले नाही पण एक क्लासिक मूवी म्हणून आज देखील हा चित्रपट ओळखला जातो.…
महानायक अमिताभ बच्चन यांना सुरुवातीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला. ओळीने डझनभर सिनेमे फ्लॉप दिल्यानंतर त्यांचा 'जंजीर' हा चित्रपट ११ मे १९७३ रोजी प्रदर्शित झाला आणि त्यांच्या करिअरचा ग्राफ एकदम वर चढला! पण या पूर्वीच्या काळामध्ये त्यांना अतिशय वाईट पध्दतीने अनेक चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते . फ्लॉप स्टार म्हणून त्यांना कोणीही…
सत्तरच्या दशकामध्ये सलीम जावेद हे नाव एका सुपरस्टार पेक्षाही मोठं होतं. कारण हे नाव म्हणजे त्या काळात मिडास टच असं झालं होतं. सलीम जावेद यांनी लिहिलेला चित्रपट म्हणजे शंभर टक्के यशाची खात्री असं जणू समीकरण च झालं होतं. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द घडवण्यामध्ये या जोडीचा फार मोठा वाटा आहे. परंतु सत्तरच्या दशकाच्या अखेरीस या जोडीमध्ये…
संपूर्णपणे भारतीय संस्कृतीचा जयघोष करीत, उच्च संस्कार मूल्यांना शीर्ष स्थानी ठेवत आणि साधेपणाच्या, सात्विकपणाच्या सर्व कसोट्या पार पाडीत राजश्री प्रॉडक्शन या संस्थेने कायम उत्तमोत्तम चित्रपट दिले. संपूर्ण कुटुंबाने सिनेमाचा एकत्रित आस्वाद घेत भारतीय समाजजीवनाला भिडणारे साधे साधे पण मूलभूत प्रश्न आणि त्याची सुलभ उत्तरे त्यांनी सिनेमातून दिली. राजश्री प्रॉडक्शन या चित्रसंस्थेचा पहिला चित्रपट होता 'आरती'.…
प्लेबॅक सिंगर मुकेश यांच्या बाबतचे अनेक किस्से सिनेमाच्या दुनियेत आज देखील ऐकायला मिळतात.त्यांची इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती,स्वतः कायम मागे राहून इतरांना पुढे आणण्याचीउत्कट इच्छा शक्ती आणि अजात शत्रू हे त्यांचे प्रमुख गुण होते. त्यांनी अनेक छोट्या संगीतकारांकडे एकाही पैसा न घेता आवर्जून गायलं. अनेक छोट्या कलाकारांच्या मागे ठाम पणे उभे राहून त्यांना स्थिर स्थावर केले.असं…
सुरुवातीपासूनच आपल्या अनोख्या दिग्दर्शन कौशल्यामुळे क्लासेस आणि मासेस दोन्हीकडील प्रेक्षक वर्गांना भुरळ घालणारे व्यक्तिमत्व म्हणजे दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा. आजची पिढी त्यांना ट्वेल्थ फेल चे डायरेक्टर म्हणून ओळखते. 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'पी के', 'लगे रहो मुन्नाभाई', 'परिंदा' या सर्व यशस्वी चित्रपटाच्या मागे विधू विनोद चोप्रा होते. पण अगदी सुरुवातीला त्यांच्या एका शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला…
हिंदी सिनेमाचे महान दिग्दर्शक राज खोसला यांचे हे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. सुरुवातीला गुरुदत्त यांचे सहायक असलेले राज खोसला यांनी सर्व जॉनरचे चित्रपट बनवले. रहस्य कथा हा त्यांचा आवडीचा विषय. भारताचे आल्फ्रेड हिचकॉक अशी देखील त्यांची ओळख आहे. ‘वह कौन थी’ हा चित्रपट ७ जानेवारी १९६४ या दिवशी प्रदर्शित झाला होता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर…
भारतीय सिनेमाच्या म्युझिकल गोल्डन इरातील प्रतिभावा न संगीतकार रोशन यांचं वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी १९६७ साली अकाली निधन झालं. त्यानंतर त्यांची पत्नी इरा रोशन यांनी त्यांच्या पश्चात दोन्ही मुलांना खूप चांगल्या पद्धतीने वाढवलं. दोघेही अगदी कमी वयात बॉलिवडच्या दुनियेत आले आणि लोकप्रिय ठरले . मोठा मुलगा राकेश रोशन अभिनयाच्या दुनियेत आला तर धाकटा राजेश…