Skip to content Skip to sidebar Skip to footer

राव आणि रंभाची ऐतिहासिक प्रेमकथा रुपेरी पडद्यावर झळकणार

हल्ली मराठी सिनेसृष्टीत बॉलीवुडच्या तोडीस तोड सिनेमे प्रदर्शित होताना पाहायला मिळत आहेत. विनोदी असो, भयपट असो, रोमॅंटिक असो किंवा मग ऐतिहासिक, आता वेगवेगळ्या धाटणीचे आणि विषयाचे सिनेमे तयार होयला लागले आहेत. आता लवकर आपल्यासमोर असाच वेगळ्या धाटणीचा आणि विषयाचा सिनेमा दाखल होणार आहे. ऐतिहासिक मात्र त्यात ही आपल्याला एक लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. ‘रावरंभा‘ या सिनेमातून आपल्या समोर एक नवीन प्रेम कहाणी उलघडणार आहे. हिंदवी स्वराज्य उभे करताना ‘छत्रपती शिवाजी महाराजां‘ना त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची. ज्यांना फक्त एकच गोष्ट ठाऊक होती ती म्हणजे आपण ‘फकस्त लढायचं, आपल्या राजासाठी अन स्वराज्यासाठी’. इतिहास नेहमीच शौर्याने, पराक्रमाने, तर कधी कधी अनेक षडयंत्रांनी भरलेला असतो.(Ravrambha Movie)

Ravrambha Movie
Ravrambha Movie

ऐतिहासिक काळातील महान व्यक्तिरेखांवर बेतलेले सिनेमे अलीकडच्या काळात आले आणि त्याला उदंड लोकाश्रयही मिळाला. याच यादीत एका चित्रपटाचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे. ‘रावरंभा‘ हा इतिहासाचा काहीसा दुर्लक्षित ‘प्रेम अध्याय’ १२ मे ला मराठी रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली रोमांचकारी प्रेमकथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अनेक प्रेमकथा गाजल्या, त्यांनी प्रेमासाठी केलेला त्याग, संघर्ष आपल्याला भावतो, अशा शौर्यवान, बुद्धिमान, पराक्रमी थोडक्यात हिमालया एवढ्या व्यक्तिमत्वामागे उभ्या राहणाऱ्या स्त्रीलाही हिमालयाची सावलीच बनावं लागतं हे दाखवून देणारा शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा चित्रपट याच यादीत येतो.

Ravrambha Movie
Ravrambha Movie

 ‘ही प्रेमकथा आहे त्यागाची, समर्पणाची, प्रेमासाठी आणि स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावायला तयार असणाऱ्या पराक्रमी रावची आणि त्यासाठी झुरणाऱ्या रंभाची’. ‘रावरंभा’ यांची प्रेमकथा अतिशय सुंदररीत्या चित्रपटात गुंफण्यात आली आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा रोमहर्षक अनुभव असणार आहे. काही मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं आहे. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रती आणि स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला असल्याचे दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात.(Ravrambha Movie)

=================================

हे देखील वाचा: मे महिन्यात ‘हे’ मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

=================================

‘मुळशी पॅटर्न’मधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ओम भूतकर आणि सौंदर्यासोबत अभिनयाचा सुरेख मिलाफ असलेली गुणी अभिनेत्री मोनालिसा बागल या चित्रपटातून जोडीच्या रूपाने समोर येणार आहेत. चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे  तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार असून यांच्यासोबत संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, आदि कलाकारांच्या ही भूमिका आहेत. ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे असुन १२ मे ला ‘रावरंभा’ ही ऐतिहासिक प्रेमकहाणी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.