या पर्वात सर्वात मोठा बदल म्हणजे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत. डॉ. निलेश साबळे ऐवजी अभिनेता अभिजीत खांडकेकर या सिझनमध्ये सूत्रसंचालन करणार आहे.
या मालिकेमध्ये ‘मेलोड्रामा’ होता, पण टिपिकल एकता कपूरचा ‘फॅमिली’ टच नव्हता. म्हणजे या मालिकेत दाखवण्यात आलेलं नायकाचं कुटुंब सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंब होतं. कुठलाही बडेजाव नाही, मोठमोठे महाल नाहीत, महागड्या साड्या नेसून, अंगभर दागिने घालून घरात वावरणाऱ्या बायका नाहीत की, मुळूमुळू रडणारी नायिकाही नाही. होती फक्त एक तरल प्रेमकहाणी.