सत्य घटनेवर आधारित चित्रपट निर्माण करताना अनेक अवधाने सांभाळावी लागतात. ती घटनेबाबतचे अधिकाधिक तपशील मिळवणे, ते रुपेरी पडद्यावर मांडताना त्याचा माहितीपट होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते (मग त्याला चित्रपटाची ओळख कशी मिळणार ?) आणि त्याला मनोरंजनाचा मुलामा द्यायचा तर मूळ घटनेतील गांभीर्य कायम रहायला हवे