सिनेमातील अशक्य अतार्किक गोष्टी म्हणजे एकाच वेळी दहा- दहा गुंडांना लोळवणे, आगीच्या ज्वाळेतून नायिकेची सुटका करणे,महापुराच्या लाटेत घुसून कुणाला वाचविणे… अशी कर्तबगारी पाहताना प्रेक्षक टाळ्या वाजवत असतात. पण अशाच अचाट गोष्टी वास्तविक आयुष्यात सामोर्या आल्या तर?