डॉ अमोल कोल्हे यांच्या रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीची सुरुवात झाली ती दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीपासून. त्यावेळी त्यांनी सह्याद्री वाहिनीवर दोन कार्यक्रम केले ‘सांगा उत्तर सांगा’ आणि नंतर ‘आमची शाखा कुठेही नाही’. आमची शाखा कुठेही नाही या कार्यक्रमाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमामुळेच ते घराघरात पोचले. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. अभिनय क्षेत्रात…