बॉलीवूडचे सत्तरचे दशक ॲक्शन मुव्हीज असले तरी त्यात देखील संगीतकार आर डी बर्मन यांनी आपल्या जादुई संगीताने मेलडीयस रंग भरले होते.
कलाकारांच्या प्रतिभेला कधी कधी अचानकपणे काही काळासाठी ग्रहण लागतं आणि काही केल्या काहीच सुचत नाही. प्रतिभा जणू कुंठीत झाल्यासारखी होते. क्रिएटिव्हीटी लोप पावते. काही काळासाठी काही सुचतच नाही !
संगीतकार राहुल देव बर्मन (R. D. Burman) यांच्यासोबत अनेक गीतकारांनी गाणी लिहिली. यात गुलजार, मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी यांच्यापासून थेट गुलशन बावरा,जावेद अख्तर यांचा समावेश होतो. प्रत्येक गीतकार सोबत आर डी बर्मन यांची मस्त जोडी जमत होती. एक विशिष्टच गीतकार पाहिजे असा त्यांचा कधीच आग्रह नसायचा.
जंजीर चित्रपटात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं एक गाणं त्या दिवशी रेकॉर्ड होणार होतं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. रेकॉर्डिंगच्या दिवशी रफी साहेबांची तब्येत बरी नव्हती. तसेच तो रमजानचा महिना असल्यामुळे, त्यांचा उपास होता. त्यामुळे त्यांना थोडा अशक्तपणा जाणवत होता. पण रफी आपल्या वक्तशीरपणासाठी खूप प्रसिद्ध होते. त्यामुळे ठरलेल्या वेळी रफी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आले.