हिंदी सिनेमाचा इतिहासात १९५३ सालापासून फिल्म फेयर अवार्डची सुरुवात झाली. आपल्याकडे याला ऑस्करचा दर्जा दिला गेला. त्यामुळे पहिले पासूनच पुरस्काराला महत्त्व लाभले आहे. नंतरच्या काळामध्ये या पुरस्कारामध्ये बऱ्याच ‘गमती जमती’ होऊ लागल्या ही बाब खरी असली तरीही आजही या पुरस्काराला महत्त्व आहेच.