५ एप्रिल १९७९ फिल्म फेअर पुरस्कार सोहळा सुरू होता. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांना डॉन या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नूतन यांना मै तुलसी तेरे आंगन की या चित्रपटासाठी मिळाला. या पुरस्कार सोहळ्या नंतर बोलताना नूतन अमिताभ बच्चन यांना म्हणाल्या ,” तुम्ही तुमच्या जिद्दीने आणि कर्तृत्वाने मिळवलेल्या यश खरोखर…
गोल्डन इरा मधील गाण्याच्या मेकिंगचे किस्से भन्नाट असतात. त्या काळात प्रत्येक कलावंत हा आपली कलाकृती दर्जेदार कशी होईल यासाठी प्रयत्न करत असायचा. एक उत्कृष्ट टीमवर्क असायचे. सर्वांचे परस्परांशी व्यवस्थित ट्यूनिंग असायचे. अर्थात ती कलाकृती बनताना वाद व्हायचे, भांडण व्हायची, मतभेद असायचे. पण याचा शेवट मात्र उत्तमच व्हायचा. गाण्याच्या मेकिंग च्या गोष्टी देखील तितक्याच भन्नाट असतात.…
निर्माता दिग्दर्शक रामानंद सागर १९६५ सालच्या ‘आरजू’ या यशस्वी चित्रपटानंतर नव्या चित्रपटाची आखणी करत होते. ‘आरजू’ हा रोमॅंटीक चित्रपट होता. राजेंद्र कुमार, साधना, फिरोज खान अभिनित या चित्रपटाने त्या वर्षी प्रचंड मोठे यश मिळवले होते. आता मात्र रामानंद सागर यांना ॲक्शन पॅक्ड थ्रिलर स्पाय मुव्ही बनवायची होती. कथा त्यांनीच लिहिली होती. या चित्रपटात नायक म्हणून त्यांच्या…
अभिनेता मनोज कुमार (Manoj Kumar) सत्तरच्या दशकापासून भारत कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले. पण त्यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपटातून विविध जॉनरच्या भूमिका साकारल्या होत्या. यात रहस्यपट होते (वह कौन थी?), प्रेमपट (सुहाग सिंदूर, हनीमून), सामाजिक पट (कांच की चुडीया). या काळात त्याने अनेक अभिनेत्रीसोबत काम केले. Manoj Kumar आणि माला सिन्हा हे दोघे पाच चित्रपटातून प्रेक्षकांच्या…