आज मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. चित्रपटांना राजाश्रयासोबतच लोकाश्रयही मिळताना दिसतो आहे.पण तरीही मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ कोणता असा जर प्रश्न कुणी विचारला तर ’प्रभात’चा काळ हेच उत्तर मिळते.१९३० ते १९५२ या उण्यापुर्या वीस बावीस वर्षाच्या कालखंडात प्रभातने उत्तमोत्तम चित्रपट दिले आणि मराठी सिनेमाला एक मानाचा दर्जा प्राप्त करवून दिला.आजच्या पीढीला कदाचित हे माहित नसेल…