तुमचे आयुष्यात कधी घोडे लागले आहेत का ? १०० टक्के लागलेच असतील, त्यात शंका नाही. पण या ‘तीन पायांचा घोडा’ चित्रपटाची स्टोरीसुद्धा काही अशीच आहे. खर तर भाडीपा म्हणजे सारंग साठेची भारतीय डिजिटल पार्टी सिनेनिर्मितीत कधी उतरली नव्हती. पण आता उतरली आणि त्यांनी धमाकाच केला आहे. मराठीत पहिल्यांदाच काहीतरी आगळं-वेगळं आणि भन्नाट आलं आहे. एक…
“हमारी सोसायटी में हम घाटी लोगो को नहीं रखते…”; जो हे वाक्य म्हणतो, त्याच्या खाडकन् कानाखाली पडते… आणि कानाखाली लगावणारे असतात छत्रपती शिवाजी महाराज! हो आपण आज महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबद्दल बोलतोय. पहिलं तर शिवराय आणि दुसरं म्हणजे शेतकरी अशा महाराष्ट्रातल्या दोन संवेदनशील विषयांवर चित्रपट बनवण्याचं धाडस त्यांनी केलं. पण तरीही…
हा आजच्या काळातला सर्वात गरजेचा चित्रपट आहे… असं म्हटलंय जगातल्या सर्वात प्रतिष्ठीत सनडान्स फेस्टिव्हलच्या ज्युरीने आणि तेही एका मराठी चित्रपटाबाबत… ‘साबर बोंडं’… भारताचा पहिला चित्रपट ज्याला याच फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राईज मिळाला. थंबनेलमध्ये तुम्ही वाचलं असेलच की, असा सिनेमा बनवायला हिंमत लागते… आणि ही हिंमत केलीये रोहन कानवडे या तरुण दिग्दर्शकाने ! LGBTQ…
कॉलेजमधला एक चार्मिंग श्रीमंत मुलगा अमर रणदिवे (ललित प्रभाकर) प्राची (हृता दुर्गुळे) नावाच्या गोड पण गोंधळलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो. दोघांच्या मधोमध वैचारिक आणि भावनिक दरीसुद्धा असते. पण तरीही दोघांची परफेक्ट लव्हस्टोरी सुरु असताना अचानक एक भलता माणूस त्यांच्यामध्ये येतो आणि इथे सुरु होता अमर आणि प्राचीच्या प्रेमाचा खेळखंडोबा ! सध्याची प्रेमाची व्याख्या थोडीशी बदललेली आहे.…
सोपारवाडीची.. मुंबईची, तिथल्या गिरणगावाची, कामगारवस्तींची, चाळसंस्कृतीची, तिथल्या सामान्य माणसाची आणि त्याच्या छोट्या मोठ्या आनंदाची, दु:खाची, शल्यांची, ताणांची आणि माणसाच्या कोतेपणाची, त्याच्याच लपलेल्या अहंपणाची गोष्ट प्रासंगिक विनोद शैलीने ‘भाऊबळी’मध्ये लेखक, दिग्दर्शकाने मांडली आहे. हा सिनेमा प्रथमदर्शी व्यक्तिकेंद्री दिसतो. पण, तो तसा नसून समूहकेंद्री अधिक आहे.
पहिल्या सिनेमांची आणि त्या चाळीच्या नावाची पुण्याई म्हणून प्रेक्षक पुन्हा एकदा या ‘दगडी चाळ २’ सिनेमाकडे नक्कीच वळेल. तत्पूर्वी ‘सिनेमारुपी’ ही चाळ कशी आहे? याचा हा केलेला उहापोह.
रोमियो आणि ज्युलिएट एकत्र यावेत की येऊ नयेत? हे उत्तर तुम्हाला मिळेल किंवा मिळणार नाही. पण रोमियोला समजून घेण्याचा प्रयत्न केलात याचं समाधान हा सिनेमा देईल…
सांगीतिक मेजवानी म्हणजे मी वसंतराव, चाळिशीनंतर घडलेल्या सुरेल कारकिर्दीची कहाणी म्हणजे मी वसंतराव, आलाप आणि तानांसोबत लावणीचा ठसका आणि आयुष्य घडविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षांची कहाणी म्हणजे मी वसंतराव!