राजकारण तर राजकारण्यांचं असतं, पण यात भरडला जातो तो सामान्य नागरिक. पण इथे तर एक साधी, सरळ, अनाथ मुलगी मोहरा बनते एका वजिराची. बलात्काराच्या जखमांनी शरीर आणि मन उद्धवस्थ झाल्यावर डोळ्यात आसवांशिवाय काहीच उरत नाही. अशावेळी गरज असते ती एका साथीदाराची. डोळ्यातली आसवं अलवारपणे पुसणाऱ्या आश्वासक स्पर्शाची. पण दुर्दैवाने तिच्या नशिबात यातलं काहीच येत नाही.