प्रत्येकाचा इगो असतोच असतो . ठराविक मर्यादेपर्यंत तो असणे गरजेचे देखील आहे. पण हाच इगो जरूरी पेक्षा जास्त ताणला गेल्याने हाच इगो त्या व्यक्तीला मागे खेचत असतो. कलावंतांचा इगो अगोदरच जरा जास्त मोठा असतो. त्यातून बऱ्याचदा गैर समज निर्माण होतात, मतभेद होतात प्रसंगी वादा वादी होते. संगीतकार ओ पी नय्यर आणि पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्यात एका…
काही काही गाण्याची कशी गंमत असते पाहा. एक गाणे 1963 साली संगीतकार सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केले. हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायलं होतं. ज्या चित्रपटासाठी हे गाणं गायलं होतं तो चित्रपट गुरुदत्त फिल्मसचा होता. या सिनेमाचं एकच गाणं रेकॉर्ड झालं होतं आणि त्याच काळात संगीतकार सचिन देव बर्मन यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला…
पन्नास आणि साठच्या दशकामध्ये आपल्या गायकीपेक्षा अभिनयात रमलेल्या किशोर कुमार यांचा जलवा काही वेगळाच होता. या काळात त्याने पार्श्वगायन करताना केवळ स्वत: साठी आणि देव आनंद करीता प्लेबॅक दिला. अभिनयात जास्त व्यस्त असल्यामुळे पार्श्वगायनाकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. या काळात किशोर कुमार यांच्या चित्रपटांना चांगले यश मिळत होते. अभिनेता म्हणून त्यांनी रसिकांवर मोठी छाप…
ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या गाण्याबद्दल, त्यांच्या दिलदारपणा बद्दल आज देखील खूप बोललं जातं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंगांवर आज देखील सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते. मोहम्मद रफी जितके चांगले पार्श्वगायक होते तितकेच किंबहुना त्याहून जास्त ते दरियादिल इन्सान होते. चित्रपट संगीत गाताना कधीही त्यांनी छोटा संगीतकार / मोठा संगीतकार किंवा छोटा अभिनेता /…
बॉलिवूडमधील ऑलराऊंडर गायक मोहमम्द रफी यांनी रोमॅंटीक, देशभक्तीपर गीतांसह उडत्या चालीची गाणी देखील गायली... तसेच, संगीत क्षेत्रातील दिग्गज मंगेशकर बहिणींसोबतही त्यांनी बरीच सुपरहिट गाणी गायली आहेत... पद्मविभूषण आशा भोसले आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबत तर रफींची विशेष जोडी जमली होती... मात्र, आता मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहिद रफी यांनी मंगेशकर बहिणींवर गंभीर आरोप केले आहेत...…