मध्यंतरी कंगना रानावत संदर्भात केलेल्या वक्तव्यांवरुन विक्रम गोखले हे वादात आले होते. पण या सर्व वादांना तेवढ्याच तडफेनं त्यांनी उत्तर दिलं होतं. मुळात विक्रम गोखले हेच एक वादळी व्यक्तीमत्व. आपली भूमिका स्पष्टपणे मांडतांना त्यांनी कोणताही आडपडदा वापरला नाही. ती भूमिका राजकीय असो वा सामाजिक.