१९७६ साली अभिनेता संजीव कुमार आपल्या लंडनच्या दौर्यात एका संध्याकाळी मित्रा सोबत ड्रिंक्स घेत होता तेव्हा भारतातून निर्माते गुलशन रॉय यांचा त्यांना फोन आला. ते म्हणाले, “हरिभाई, आम्ही एक सिनेमा बनवत आहोत. सलीम जावेद यांची स्क्रिप्ट आहे. यश चोप्रा सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमातील एक महत्त्वपूर्ण भूमिका आम्ही तुम्हाला ऑफर करत आहोत. ही भूमिका…