ए आर रहमान (A. R. Rahman ) भारतातील संगीत क्षेत्रातले (Indian Music Industry) असे नाव ज्या नावाने ना केवळ भारतात तर संपूर्ण जगभरात अफाट लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. कल्पनेपलीकडील प्रतिभा असलेल्या ए आरा रेहमान यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितींवर मात करत हे नेत्रदीपक यश संपादित केले आहे. (A. R. Rahman )
भारतीय संगीताला नवीन जागतिक ओळख…
आजच्या तरुण पिढीचा लाडका गायक म्हणजे केके (KK). अगदी कमी काळात त्याने तरुणाईच्या हृदयात घर केले. त्याच्या अकाली मृत्यूने प्रत्येक जण हळहळला. त्याच्या आवाजामध्ये एक कशिश होती. एक आर्तता होती. जी श्रोत्यांच्या काळजाला भिडत असे.
किशोर कुमारच्या अनेक आठवणी आज देखील आपल्याला अचंबित करतात. संगीतकार मदन मोहन यांच्याकडे एक गाणे किशोर कुमारने(kishore kumar) अक्षरशः अर्धा तासांमध्ये रेकोर्ड केले आणि लगेच धावत पळत जाऊन त्याने पंचमदाचे गाणे रेकॉर्ड केले आणि तिथून पळत जाऊन त्याने फ्लाईट पकडली!
How did Kavita Krishnamurthy get this song? marathi info.
ॲक्शन, इमोशन, ट्रॅजेडी, कॉमेडी या प्रत्येक प्रांतात अमिताभ प्रचंड यशस्वी होत होता. १९७८ साली अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्रिशूल, डॉन, गंगा की सौगंध, मुकद्दर का सिकंदर, कस्मे वादे, बेशरम … यातील महत्त्वाचा सिनेमा होता ‘डॉन’.
हिंदी सिनेमातील गाण्यांच्या जन्म कथा खूप मनोरंजक असतात. ही गाणी बनताना त्यावेळी खूप नाट्य घडलेली असतात पण जेव्हा ही गाणी रसिकांच्या समोर येतात तेव्हा या गाण्याच्या मिटिंगच्या वेळेसच्या झालेल्या नाट्यमय घडामोडी आठवून कलाकार मनसोक्त हसतात ! असाच काहीसा प्रकार मजरूह सुलतानपूरी यांनी लिहिलेल्या एका गाण्याबाबत झाला होता.
सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सुपरस्टार पार्श्वगायक किशोर कुमार यांना एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या गाण्यांवर ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनने बहिष्कार टाकला होता, बॅन लावला होता.
सुरील्या आनंदाच्या प्रसंगाच्या आठवणीने आपलं मन पुन्हा पुन्हा प्रफुल्लित होत असतं. आयुष्यभर मोरपिसासारखं ती आठवण आपण जपून ठेवत असतो. अशा घटना प्रत्येकाच्या आयुष्यातच घडत असतात आणि जर त्याच कलावंताच्या आयुष्यात जर घडत असतील तर त्याला वेगळी खुमारी येते. ख्यातनाम अभिनेते शम्मी कपूर यांनी आपल्या ‘शम्मीकापूर अनप्लगड…’ या कार्यक्रमातून अशाच काही आठवणी एका व्हिडिओमध्ये शेअर केल्या होत्या. त्यातलीच ही एक…
हिंदी चित्रपटसृष्टीच्या अनेक अलिखित नियमांतील एक म्हणजे, सुपर हिट पिक्चरमधील अगदी छोट्याच छोट्या कलाकारालाही एखादी इमेज चिकटणे, नवीन चित्रपट मिळत राहणे आणि त्यातूनच आपली वाटचाल करणे. हाच रियॅलिटी शो चित्रपट पार्श्वगायक, गीतकार, संगीतकार यांच्याबाबत का बरे घडत नाही.
‘दिलसे’च्या पूर्वप्रसिध्दीची सुरुवात कशाने? छय्या छय्या गाण्याने. तीनदा दाखवले हो. पॅसेंजर ट्रेनच्या टपावर शाहरुख खान आणि मलय्यका अरोरा बेभान बेफाम नाचत आहेत. सोबतीला डान्सर आहेतच. (यालाच टोळी नृत्य म्हणत). वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या टपावर गीत संगीत व नृत्य म्हणजे भारीच काम.