इराणमधलं वास्तव, तेथील समाजाची स्थिती, सरकारकडून सहन करावा लागणार अन्याय, तेथील विषमता, गरिबी असे विषय अतिशय प्रभावीपणे मांडणं, ही जाफर पनाही यांच्या फिल्ममेकिंगची खासियत आहे. आता अशा विषयांवर चित्रपट बनवल्यावर इराणमधलं सरकार त्यांच्यावर नाराज असणारच. म्हणूनच संधी मिळताच सरकारने सहा वर्षांसाठी पनाही यांना तुरुंगात डांबलेलं आहे.