
Vishakha Subhedar यांचा मुलगा अभिनय अखेर मायदेशी परतला!
अमेरिका, इस्राएल आणि इराणमधील संघर्षामुळे आखाती भागातील अनेक देशांत तणाव वाढला आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम प्रवाशांवरही झाला असून विमानसेवा विस्कळीत झाली आहे. अशा काळात काही भारतीय नागरिक कुवेतमध्ये अडकले होते, त्यात मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार (Actress Vishakha Subhedar) यांचा मुलगा अभिनव सुभेदार (Abhinay Subhedar)देखील होता.जो कुवेतमध्ये ट्रान्झिट करत असताना अचानक सुरू झालेल्या तणावामुळे अडकला. अभिनव कुवेतमध्ये थांबल्यानंतर, इराणकडून कुवेतवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका निर्माण झाला. परिणामी कुवेतचे आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आणि अनेक उड्डाणे रद्द झाली. अभिनयसह काही भारतीय नागरिक तिथे अडकले, ज्यामुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी मदतीची मागणी केली होती. त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज ठाकरे (Raj Thackery) यांच्याकडे मदतीची विनंती केली.(Vishakha Subhedar)

यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन करून विशाखा सुभेदार यांना आश्वस्त केले की त्यांचा मुलगा सुरक्षित परत आणला जाईल. भारतीय नागरिकांना भारतात आणण्यासाठी सौदी अरेबियामार्गे रियाधद्वारे मार्ग आखण्यात आला. व्हिसा प्रक्रियेत काही अडथळे आले असतानाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर विदेश मंत्रालयातील अधिकारी असीम महाजन यांनी या प्रक्रियेला गती दिली.

अखेर अभिनय सुभेदारसह सुमारे ३० महाराष्ट्रीयन नागरिकांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळाला. त्यांनी सुमारे ७०० किलोमीटरचा रस्त्याचा प्रवास करून रियाध गाठला आणि तिथून ९ मार्च रोजी रात्री ११:१० वाजता मुंबईकडे उड्डाण केले. १० मार्च रोजी पहाटे ३ वाजता हे सर्व प्रवासी सुरक्षितपणे मुंबईत दाखल झाले. या संपूर्ण प्रक्रियेत कुवेतमधील भारतीय दूतावासाने महत्त्वाची भूमिका बजावली.(Vishakha Subhedar)
=============================
हे देखील वाचा: Apurva Gore Wedding: शुभमंगल सावधान! ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात; समोर आले लग्नसोहळ्याचे फोटो…
==============================
अभिनव सुभेदारसह इतर नागरिक सुरक्षितपणे भारतात परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. युद्धजन्य परिस्थितीतही भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारी प्रयत्न यशस्वी ठरल्याने सर्वांसाठी एक समाधानकारक शेवट ठरला.