दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी ‘आराधना’ (१९६९) या चित्रपटातील ‘मेरे सपनो की रानी कब आएगी तू..’ या गाण्याच्या वेळी केलेला जुगाड सर्वांना माहिती आहे. दार्जिलिंगमध्ये या गाण्याच्या शूटिंगच्या शेड्यूल होते. नेमके त्याच वेळेला शर्मिला टागोर सत्यजित रे यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे ती लोकेशन वर पोचू शकली नाही. शक्ती सामंत यांनी भन्नाट जुगाड केला त्यानी…
पन्नासच्या दशकामध्ये मधुबाला रसिकांच्या दिलाची राणी बनली होती. तिच्या सौंदर्याने सर्वजण घायाळ होत होते. प्रत्येक जण तिला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक होता. दिग्दर्शक शक्ती सामंत यांना देखील आपल्या चित्रपटात मधुबाला घ्यायचे होते. १९५६ साली त्यांनी स्वतःचे ‘शक्ती फिल्म’ नावाचे बॅनर उभे केले आणि पहिला चित्रपट निर्माण केला ‘हावडा ब्रिज’. हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्री होता.