भारतीय सिनेमाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षराने नोंदवलेला ‘मुगल ए आजम’ हा चित्रपट आज देखील कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. ५ ऑगस्ट १९६० रोजी मुंबईच्या मराठा मंदिरमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने संपूर्ण सिने दुनियेत मोठी हलचल निर्माण केली होती. के आसिफ या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. अतिशय तब्येतीने बनवलेला हा चित्रपट त्यातील प्रत्येक गोष्टीसाठी आजही आठवला जातो.…